शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे नागरिकांची दमछाक


कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम  कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. दि. १४ डिसेंबर रोजी धोत्रा देशमुख येथील ग्रामस्थ काही कामास्तव बांधकाम विभाग कार्यालय कारंजा येथे गेले असता तेथे अधिकारी हजार नव्हते त्यामुळे त्याना आल्या पावली परत येणे भाग पडले. लाडेगाव ते धोत्रा देशमुख ह्या रस्त्याची तक्रार घेऊन देशमुख, मेश्राम व हुमणे हे ग्रामस्थ भारिप बहुजन महासंगचे  जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यालयीन वेळेत गेले असता तेथे कोणताही अधिकारी हजर नव्हते . त्यामुळे संबाधीत कामानिमित्त गेले असता त्या संबधी कोणाकडे बोलणी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. असेच अनेक वेळा ग्रामस्थांना परत येण्याची पाळी येते. शासकीय अधिकाऱ्यांना त्याच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहण्यापेक्षा त्यांचे वयक्तिक कामे जास्त महत्वाची वाटतात असे ग्रामस्थ बोलत होते. तसेच कामरगाव ते बेंबळा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागाने त्यावरील गड्यावर चुन्याने खुणा मारून ठेवल्या पण ते खड्डे  बुजवण्याचे काम अद्याप सुरु झाले नाही. याचा अर्थ असा कि, शासकीय कर्मचाऱ्यांना आपले काम करण्यास काहीच रुची वाटत नाही असे निष्पन्न होते.  
विनोद नंदागवळी 
. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा