मंगळवार, २ जानेवारी, २०१८

मार्च २०१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन : गणेश पाटील



              स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे वैयक्तिक शौचालय बांधणीला वेग आला असून गेल्या तीन वर्षात तब्बल १ लक्ष १३ हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती तसेच कारंजा तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. हागणदारीमुक्त झालेला हा अमरावती विभागातील पहिलाच तालुका आहे. २६ जानेवारी २०१८ पर्यंत मंगरूळपीर तालुका हागणदारीमुक्त करण्याचे तसेच मार्च २०१८ अखेर पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा