वाशिम, दि. १९ : प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना सन २०१७-१८ करीता लाभ घेण्यात इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून ई-ठिबक प्रणालीवर ऑनलाईन अर्जासाठीची अंतिम मुदत दिनांक १५ मार्च २०१८ आहे.तसेच दि. १५ मार्च २०१८ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांना दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्वसंमती देण्यात येईल. सदर यादी सन २०१८-१९ या वर्षात पुढे ओढण्यात येईल. पुर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना दि. ३१ मे २०१८ पर्यंत सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणे बंधनकारक राहील. जे शेतकरी दि. ३१ मे २०१८ पर्यंत सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे सन २०१८-१९ च्या पुढे ओढण्यात आलेल्या यादीतून वगळण्यात येतील. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स मीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा