अतिक्रमणामुळे वाहतुकीचा होत आहे खेळखंडोबा
वाहतुक सुरळीत करन्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देन्याची गरज
जय गिरी-प्रतिनिधी मंगरुळपीर
दर शनिवारी मंगरुळपीर येथे आठवडी बाजार भरतो परंतु या बाजाराच्या ठिकाणच्या मानोरा चौकात वाहतूकीचा खेळखंडोबा नेहमीच बघायला मिळत असुन ट्राफिक पोलिस कर्तव्य बजावन्यात असमर्थ तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत असल्याने मंगरुळपीर शहरातील अस्ताव्यस्त दिवसेदिवस होत चाललेली वाहतुक सुरळीत करन्यासाठी आता वरिष्ठांनीच लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अनेक खेड्यातील लोक मंगरुळपीर येथे शनिवार रोजी भरत असलेल्या आठवडी बाजारात बाजारासाठी तर दुकानदार व्यवसायासाठी येत असतात.हा बाजार मानोरा चौकालगत असलेल्या ठिकाणी भरतो.परंंतु या चौकात या बाजाराचे दिवशी अनेकदा चक्काजाम होत असतो आणी वाहनधारक तासभर तरी अडकुन पडन्याचा प्रकार नेहमीच होतो.यामुळे किरकोळ अपघात आणी वाहतूकीवरुन वादही नेहमीच होतात.परंतु ईथे तैनात वाहतुक पोलिस कधी दिसत नसल्यांची अनेकांची ओरड आहे.ट्राफिक पोलिस फक्त आॅटोवाल्याकडुन हप्ते जमा करन्यातच व्यस्त असतात अशी दबक्या आवाजात सर्वञ चर्चा होत होती.दि.२५ च्या आठवडी बाजाराच्या दिवशी तब्बल तासभर मानोरा चौकात वाहतूक जाम झाली होती आणी वाहनधारक या ट्राफिकमधे अडकुन पडले होते.पण ट्राफिक पोलिस येथे तैनात नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला होता.ही वाहतूक नेहमीच जाम होन्याचे मुख्य कारण अनेक व्यापारी आपली दुकाने मानोरा चौकात अगदी रोडपर्यत लावतात त्यामुळे ही वाहतुक जाम होत असल्याचे चिञ आहे पण हे अतिक्रण काढन्याचे धाडक सबंधित प्रशासन का करत नाही हा प्रश्न अनूत्तरीतच राहत आहे.आता हा दर आठवड्याला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावन्यासाठी वरिष्ठांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.पोलिस विभागानेही फक्त हप्ते न घेता आपले कर्तव्य चोखपणे बजावावे अशी चर्चा होत आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
जय गिरी,प्रतिनिधी मंगरुळपीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा