मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

उकळी पेन गाव बनले अनाथालय

  उकळी पेन गाव बनले अनाथालय....स्थानिक जनप्रतिनिधि ,शासकीय , प्रशासकीय  कर्मचाऱ्याचा नाकर्तेपणा...!
-6 डिसेंबर
उकळी पेन :- उकळी पेन गाव तस चांगल पण वेशीला टिंगल, या गावामधून खासदार, आमदार यांना जवळ पास हजारांवर मते पेटी प्याक करून घेऊन जातात. ते पण कोणत्याही स्थानिक पातळीवर असलेल्या पुढारी वर्गा मुळे नाही तर ते गावातील मतदार लोकांच पक्ष प्रेम म्हणून मोठ्या प्रमाणात भाजप, सेनेच्याउमेदवारांना उकळी पेन येथील मते कुठलाही खर्च न करता मिळतात. अशी परिस्थिती असताना सुद्धा या गावा कडे दुर्लक्ष केले जात आहे. जवळ पास येथील तलाठी मँडमची तक्रार करून त्यांना येथून बदली करण्यात आली असून आज पर्यंत आठ महिने पूर्ण झाले असून आता पर्यंत गावाला तलाठी देण्यात आला नाही तर आठ महिन्यात गावचा कारभार चार प्रभारी तलाठी वर्गाकडे शेतकरी अडचणीत आले. एक वर्षा पासुन गावात लाईनमन नाही. कृषी सहायक गावाला नाही. ग्राम पंचायत ला ग्राम सचिव नाही, पोलिस पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोलिस पाटील जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली पण गावात पोलिस पाटील नाही. गावात पोलिस चौकी आहे पण पोलिस नाहीत, तर 27नोहेंबर पासुन गावाला सरपंच, उपसरपंच नाहीत, असे उकळी पेन गाव सध्या अनाथ आश्रम बनले आहे. याकडे सबंधित वर्ग व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, या गावाला त्वरित वरिल सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची आवश्यकता असुन नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. 

सम्राट टाईम्स 
सुरेशभाऊ इंगोले 
8830966982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा