शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं-सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला

सदाभाऊ खोत
सम्राटटाइम्स.ब्लाॅगपोस्ट.इन
कोल्हापूर - मी पळून गेलो नाही तर मला पळवून लावण्यात आलं अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर  केली आहे.
सदाभाऊ खोतांना काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. मला संघटनेतून घालवलं होतं असंही ते यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी नव्या पक्षाची घोषणाही मुंबईत केली. तसंच संघटनेत झालेल्या चौकशीलाही मी ताठ मानेने सामोरा गेलो असंही ते म्हणाले. 30 सप्टेंबर इचलकरंजीतून सदाभाऊ खोत आपली नवी  रणनीती जाहीर करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा