सम्राट टाइम्स न्यूज
आज समाजात वेगवेगळ्या विचारधारा प्रवाहीत होत आहेत. अनेकजण पैशाला महत्व देत आहेत. तर काही जण पदव्याला महत्व देत आहेत. सोबतच आपले आजारही आजकाल पदव्याप्रमाणे सांगण्याची सवय अनेकांना झालेली आहे. ही फार मोठी विचित्रता आहे. शरीर व मनाविषयी जागृतता नाही. जगात सर्व संपत्ती देवून मनाला सांभाळा कारण मन हीच सर्वात मोठी संपत्ती आहे असे प्रतिपादन श्रीश्री रविशंकर यांच्या परमशिष्या देवी वैभवश्रीजी यांनी केले.
स्थानिक मॉ गंगा मेमोरीयल बाहेती हॉस्पीटल येथील श्रीश्री रविशंकर सभागृहात 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजीत युवा मेळाव्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. मंचावर जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, डॉ. हरिष बाहेती, डॉ.सौ. सरोज बाहेती, समाजसेवी निलेश सोमाणी, अविनाश मारशेटवार आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना देवी वैभवश्रीजींनी सांगीतले की, आयुष्यात ध्येय निश्चित करा. निर्णय घेतांना जीवनाकडे पहा. केवळ आत्मीक आनंदामागे न धावता जो कायमस्वरुपी आनंद देईल त्याची प्राप्ती करा. योग, प्राणायाम, सुदर्शनक्रिया, ध्यान करा. आईवडीलांच्या इच्छेविरुध्द कार्य करु नका. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी जोपर्यत त्याला आध्यात्माची जोड मिळणार नाही तोपर्यत खरा विकास शक्य नाही. विज्ञानाच्या सर्व समस्येचे निराकरण अध्यात्माच्या माध्यमातून योग वसिष्ठ पुस्तकात सांगण्यात आलेले आहे. डॉ. बाहेती दांम्पत्यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. जगात लहानातल्या लहान गोष्टीला महत्व द्या असे आवाहन त्यांनी केले. माता वैभवश्री व मान्यवरांच्या हस्ते यावेळी अविनाश मारशेटवार यांच्या दान परि अवयवरुपी उरावे या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष बाहेती तर आभार निलेश सोमाणी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत राजेसह नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा